माउली नंतर समाधी नाही |
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही |
शिवराया नंतर छत्रपती नाही|
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहण नाही |
रामानंतर आचरण नाही |
रावणानंतर श्रीमंती नाही |
गरुडानंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||
चांगलीच विचारधारा जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही. .......☝
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........☝
सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......☝
समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......☝
मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......☝
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........☝
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......☝
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......☝
जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....☝
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......☝
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......☝
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत,
एक मागे,
एक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत,
ह्याच नाव "जीवन" आहे.🙏
🐾साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
🐾हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
🐾जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
🐾साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
🐾तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो
🐾विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ...
🐾समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
🐾काहीजण त्यातुन मोती उचलतात,
🐾काहीजण त्यातुन मासे घेतात तर
🐾काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
🐾हे विश्व पण सर्वानसाठी सारखेच आहे,
🐾फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.
No comments:
Post a Comment