Sunday 6 December 2015

ना मस्जिद आजान देती, ना मंदिर के घंटे बजते - हरिवंशराय बच्चन

, ना मस्जिद आजान देती, ना मंदिर के घंटे बजते

ना अल्ला का शोर होता, ना राम नाम भजते

ना हराम होती, रातों की नींद अपनी
मुर्गा हमें जगाता, सुबह के पांच बजते

ना दीवाली होती, और ना पठाखे बजते
ना ईद की अलामत, ना बकरे शहीद होते

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता....
…….काश कोई मजहब ना होता....

ना अर्ध देते , ना स्नान होता
ना मुर्दे बहाए जाते, ना विसर्जन होता

जब भी प्यास लगती , नदिओं का पानी पीते
पेड़ों की छाव होती , नदिओं का गर्जन होता

ना भगवानों की लीला होती, ना अवतारों
का
नाटक होता
ना देशों की सीमा होती , ना दिलों का
फाटक
होता

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता.....
…….काश कोई मजहब ना होता....

कोई मस्जिद ना होती, कोई मंदिर ना होता
कोई दलित ना होता, कोई काफ़िर ना
होता

कोई बेबस ना होता, कोई बेघर ना होता
किसी के दर्द से कोई, बेखबर ना होता

ना ही गीता होती , और ना कुरान होता
ना ही अल्ला होता, ना भगवान होता

तुझको जो जख्म होता, मेरा दिल तड़पता.
ना मैं हिन्दू होता, ना तू मुसलमान होता

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता।

–हरिवंशराय बच्चन

Friday 4 December 2015

तरुणांसाठी

तरुणांसाठी :--

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.💮

2) दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.💮

3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.💮

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.💮

6) मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.💮

7) चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत देवस्थळी, प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल.💮

8) इंग्लिश बोलायला शिका.
     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮

9) व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.

कुलकर्णी विशेषांक

कुलकर्णी विशेषांक 😎😃



"नावात काय आहे..." ...
हे शेक्सपियरचे शब्द त्याच्याच नरड्यात घालायचे काम ... भारतातील कुलकर्णी नावाची माणसे करत आहेत, असे मी नेहमी म्हणतो, ज्यात काडीचीही  अतिशयोक्ती नाही.
.
कोणतेही क्षेत्र असो, 'कुलकर्णी' आपला ठसा उमटवतातच असे पूर्वी म्हटले जायचे...
आता..... कुलकर्णी ज्या क्षेत्रात जातात, त्याक्षेत्राचे नाव उंचावतात असे म्हटले जाते....
कुलकर्णी कुलोत्पन्नांनी ... म्हणजे अगदी, ज्ञानेश्वरांपासून अलौकिक साहित्य निर्मिती करून नाव कमवायला सुरवात केली ...
संत एकनाथ महाराज सुद्धा कुलकर्णी कुलोत्पन होते ...
निवृत्ती नाथ, संत सोपान यांनी कुलकर्णी आडनाव अधिक उंचावर नेले
.
जिजाबाइंनी , शिवाजीला योग्य शिक्षण मिळावे म्हणून ज्यांची नेमणूक केली होती ... ते दादोजी कोंडदेव हे दुसरे, तिसरे कोणी नव्हते तर कुलकर्णी कुलोत्पन होते.
.
रामचंद्र पंत अमात्य आणि परशुराम त्र्यंबक यांचे शिवाशाहीतले योगदान असामान्य होते.
.
अफजलखानाला सुद्धा कुलकर्णी लोकांचे महात्म्य समजले होते... म्हणून, त्याने प्रतापगडावर शिवाजीला भेटण्यापूर्वी, कृष्णाजी भास्कर नावाच्या आसामी ला वकील नेमले होते... जे दादोजी कोंडदेव ह्या कुलकर्णी कुलोत्प्नाच्या शिष्याला कोंडीत पकडू शकतील.
.
वि.म., जी, ए., वा.ल., व.दि., द. भि.,गुरुनाथ, कृष्णाजी पांडुरंग असे अनेक मराठी साहित्तिक स्वत:चा ठसा ... कोरून ... गेले आहेत...
कला क्षेत्रात ... जयवंत, सलील, ...सोनाली , सोनाली, मृणाल,नीना, दिलीप, मंगेश, गिरीश , अतुल, संदीप, सुकन्या, ममता, पल्लवी हे 'कलाकार' तर दुसर्या आडनावाच्या लोकांना ... इथे चुकून आलात का ...असेच विचारात असावेत असे वाटते
पठ्ठे बापूराव, चुकून वेगळ्याअशा कला क्षेत्रात, म्हणजे, तमाशा, लावणी करणाऱ्या लोकान एकरूप झाले. ... पण तमाशा, लावणी ह्या क्षेत्राचे नाव उंचावर नेले ... आणि स्वत:चेही
धोंडूताई कुलकर्णी यांच्या गायना नंतर ... सूर लावायची हिम्मत कोणताही गायक / गायिका करत नसे ...
.
डी एस कुलकर्णी यानी पुण्यातली अर्ध्याहून जास्त घरे बांधली आहेत असे सांगितले तर अचंबा वाटणार नाही...
सुपर कॉम्प्युटर बनवणाऱ्या सी ड्याक मध्ये संचालक असलेल्या , मंगेश या माणसाचे आडनाव कुलकर्णी होते... हा काही योगायोग नाही.
क्रिकेट मध्ये निलेश, धवल, उमेश, राजू अशी बोलिंग करतात कि त्यांच्या समोर फलंदाज टिकत नाहीत
बीजेपीचे प्रमोद महाजन जेंव्हा सुसाट धावत होते, भारताला शायनिंग वाढवत होते तेंव्हा त्याना एनर्जी द्यायचे काम संघाचे ...सुधींद्र कुलकर्णी हेच करत होते.
.
'कुलकर्णी' नावाचे महात्म्य इतके आहे की जगप्रसिद्ध, आनंद या राजेश खन्नाच्या सिनेमात ... रमेश देव चे नाव ... डॉक्टर प्रकाश कुलकर्णी असे होते... म्हणजे...मराठी माणूस जर शिकलेला असेल तर त्याचे आडनाव कुलकर्णीच असणार ... हे हृषीकेश मुखार्जीना सुद्धा वाटत होते.
आज सुनील कुलकर्णी या कायदेतज्ञाची, अमिरिकेत, न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याचे समजले तेंव्हा म्हटले ... की शेक्स्पीयरचे वाक्य चूक ठरवायची हिम्मत केवळ कुलकर्णी हे आडनावात आहे ...
जाता जाता .....
-------------
त्या इन्फोसिस च्या नारायण मूर्तीचे नाव झाले, कारण, त्याला कुलकर्ण्यांची 'सुधा', सहचारिणी लाभली म्हणून...
.
To all  KULKARNI

Wednesday 2 December 2015

स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द

स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली...
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले...

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं...

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा...

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

कुटूंबावर, पती-पत्नीवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष्य  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.

१२

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.

मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्ष १२ महिन्यांचे.

आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात.बारावा गुरू, शनि, मंगळ हानिकारक समजले जातात.

पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.

घड्याळात आकडे बारा. पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.

पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे  मध्यरात्र झाली असे समजत.

एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.

जिकडेतिकडे सकाळीभरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.

पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.

इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.

नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.

१२ बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ. शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.

एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.

तसेच  कोणाचेही न ऐकणाय्रा  रंगेल व रगेल  दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही "काय बाराचा आहे हा" असा शब्दप्रयोग वापरतात.

१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.

मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.

१२ गावचा मुखिया.

जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.

अशी ही १२ ची किमया...
.
.
.
.
.
.
.
.



.
.







.
.

.







.
.
.
.
..
..

.
..
.
.
,

,



आणि म्हणूनच पवार साहेबाच्या गावाच नाव 12मती.......!!!!

आणि पुणेकर MH-12