Saturday 27 May 2017

देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क

भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.

मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.

भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात

आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.

म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात.

हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात.

होळी, दिवाळी हे कॉमन.

आता त्या पाठोपाठ गणपती हा सण भावनेने ओथंबलेल्या संदेशांच्या पंगतीला आला आहे.

महाराष्ट्रातील सकल प्रदूषणाचा कर्ता एकटा गणपती बाप्पा आहे, हे आपण मनावर ठासून घेत आहोतच.

आता त्यापाठोपाठ एक गाव एक गणपती, गणपतीला फुलं मिठाई नको, लालबागचा राजाच नवसाला पावतो का?

खरं तर कोणताच गणपती नवसाला पावत नाही वगैरे वगैरे संदेश यायला लागले आहेत.

गणपतीच्या अनुषंघाने एका मेसेजमध्ये भारतातील देवळांच्या आणि देवांच्या कमाईवर सवाल उठवला आहे.


तर प्रश्न चांगला आहे, लोकशाहीत अश्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळायलाच हवं.

प्रश्नकर्त्यांचा अधिकारच आहे तो. ह्यालाच लागून आलेला उपप्रश्न म्हणजे

देवळांना पैसे द्यावेच का?

तो पैसा भारतातील गोर गरीब जनतेला, अडल्या नडल्यांना देता येऊ शकत नाही का?

अनेक संसार त्यात सावरले जाऊ शकतात वगैरे वगैरे !


उद्देश चांगला आहे, असा आलेला मेसेजही भावनेच्या पाकात घोळवून काढलेला असल्यामुळे आकर्षक आहे.

पण म्हंटलं ना कि भावना आणि लॉजिक्स हि एकमेकांसोबत कधी जात नाहीत. इथेही तेच झालंय.

ज्या चांगल्या भावनेने आपण गणपतीच्या देणगीचा प्रश्न उचललाय त्याच चांगल्या भावनेने

भारतातल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या तीन गोष्टींच्या आर्थिक व्यापाकडे बघुयात !

ह्यातली आपल्या सर्वांची पहिली आवडती गोष्ट म्हणजे ' चित्रपट ',

दुसरा नवीन लागलेला छंद म्हणजे ' आय पी एल '

आणि तिसरी जिव्हाळ्याची पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजे

' मद्य अथवा दारू '...

फिल्म फ्रॅटर्निटी वगैरे म्हणतात त्या चित्रपट सृष्टीने २०१५ साली १४०० करोडपेक्षा जास्त धंदा केला होता.

ह्यावर्षी सप्टेंबर पर्यंत १४०० करोडच्या आसपास धंदा केला आहे.

एकट्या 'सुलतान' चित्रपटाची कमाई ३५० कोटी रुपये आहे.

ह्या सर्वात साऊथ इंडियाचा एकही पिक्चर नाही,

'कबाली' हा ब्लॉकबस्टर नाही किंवा 'सैराट' सारख्या इतर प्रादेशिक चित्रपटांची गणना नाही.

शिवाय हा अधिकृत हिशोब आहे, अनधिकृत किती असेल त्याची कल्पना नाही.

ह्याआधीच्या वर्षांच्या कमाईचा हिशोब ह्यात नाहिये.

आपला दुसरा आवडता नवीन छंद म्हणजे 'आय पी एल'.

आयपीएलचा ह्यावर्षीचा टर्नओव्हर १२०० कोटी रुपयांच्या आजूबाजूला आहे.

सोनी मॅक्स चॅनलला ह्यावर्षी फक्त जाहिरातींमधून अपेक्षित असलेला रेव्हेन्यू होता १२०० कोटी रुपये.

शिवाय बी सी सी आयने प्रक्षेपणाचा केलेल्या कराराची किंमत आहे ८२०० कोटी रुपये.

ह्याही सर्व अधिकृतरित्या जाहीर झालेल्या फिगर्स, अनधिकृत काही असेल तर त्याची कल्पना नाही.

भारतातील तिसरा आवडता छंद म्हणजे 'दारू'.

'द हिंदू' च्या आकड्यानुसार भारतात दर वर्षी २० बिलियन लिटर दारू विकली जाते

आणि फक्त दारूचा वर्षभरातला व्यवहार होतो १ लाख कोटी रुपयांहून अधिक.

गणपतीचा किंवा देवळांचा आर्थिक व्यवहार कॅम्पेअर करण्यासाठी मी ह्या तीनच गोष्टी वापरल्या आहेत.

आणि ह्या वापरल्या आहेत कारण देवळातली किंवा गणपतीची देणगी जशी सर्वसामान्यांच्या खिशातून जाते त्याचप्रामाणे

हे सर्व आकडे आपणच आपल्या खिशातून कन्ट्रीब्युत केलेले असतात.

चित्रपट, आयपीएल आणि दारू ह्यासोबत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईल्स, फूड चेन्स, सोनं, चांदी ह्या सर्वांची माहिती यात धरली जाऊ शकते.

पण तेवढं खोलात जायची गरज नाही. कारण तुलनेसाठी ह्या तीनच गोष्टी पुरेश्या आहेत.

त्यातून हा सर्व रॉ डेटा आहे. अजून खोलात शिरलो तर अजूनही बरेच मोठे आकडे हाती येतील.

गंमतीचा भाग असा की ह्या सर्व गोष्टी आपण आता गरज ह्या सदरात टाकल्या आहेत.

पण त्याचवेळी देव हि देखील एक भावनिक गरज आहे हे आपण मान्य करत नाही.

माझा देव हि माझी एक सपोर्ट सिस्टिम आहे

आणि तिचं सगुण स्थान टिकवून ठेवायला मलाच खिशात हात घालावा लागणारे हे आपण मान्य करत नाही.

लालबागच्या राजाच्या पेटीचा जो काही कोट्यांमध्ये हिशोब आहे तो बाहेर काढायला आपण सरसावतो,

त्या पैशाच्या दानात किती लोकांचं कुटुंब चालू शकतं, किती शेतकरी आपलं घर सावरू शकतात हे हिशोब आपण हिरीरीने करतो.

पण दारू पिताना एका बीअरच्या पैशात एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण सुटू शकेल हा हिशोब कुणी करायला जात नाही

की आय पी एलचं तीन चार हजाराचं तिकीट काढताना एखाद्या विद्यार्थ्याचा चार सहा महिन्यांचा अभ्यासाचा खर्च त्यातून भागू शकेल

हा विचार केला जात नाही.

तीच गोष्ट चित्रपटांची.

१०० कोटीचा धंदा केलेला पिक्चरच्या रेव्हेन्यूमध्ये आपलं सहा सातशे रुपयांचं कन्ट्रीब्युशन असतं

आणि तेही कुणाला तरी उपयोगी पडू शकेल हे आपल्याला मान्य करायचं नसतं.

येऊन जाऊन हिशोब सणांच्या आणि देवांच्या नावाखाली खर्च होणाऱ्या पैशाचा मागितला जातो.

लालबाग, सिद्धिविनायक किंवा अजून कोणतीही देवस्थाने ह्यांना मिळणारा पैसा हा सायलेन्सर तुटलेल्या बाईकसारखा आहे,

स्पीड २० चाच पण गोंगाट मात्र हा मोठा !!!


सर्वात महत्वाचं म्हणजे दान धर्म आणि इतर हिशोब ह्यासर्वांवर मेसेजेस आपल्या सणाच्या वेळीच येताना दिसतात.

एखाद्या खानाचा पिक्चर रिलीज होतोय, तो पाहू नका,

ते पैसे एखाद्या संस्थेला द्या

किंवा ३१ डिसेंबरला दारू पिऊ नका ते पैसे एखाद्या कुटुंबाला द्या असं कधी वाचलंय?

असं कधीच होणार नाही.

कारण भावनेत घोळवलेली भाषा वापरून आपले सण त्याने निष्प्रभ होणार नाहीत.

ते काम फक्त होळी, गणपती, दिवाळी ह्यातच होऊ शकतं.

आपली श्रद्धास्थानं बुडवणं, त्यांच्यापासून आपल्याला लांब नेणं हे एक कारस्थान आहे.

लोकांचे आदर्श बुडाले कि देश सहज बुडवता येतो.

भावनिक खच्चीकरण अर्थात डिमोरलायझेशनची हि एक पायरी आहे आणि आपण स्वतः हुन त्यावर जाऊन बसतोय.

त्यामुळे दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.

आपली बुद्धी गहाण टाकू नका आणि बुद्धिभेद करणाऱ्या एकाही मेसेजला बळी पडू नका.

ज्याप्रमाणे समाजात तळागाळातल्या लोकांना हात देणं हे आपलं कर्तव्य आहे

त्याच प्रमाणे

देव, देश आणि धर्म ह्यांना बळ देणं हे आपलं काम आहे आणि ते विसरता कामा नये.

No comments:

Post a Comment